Homeताज्या बातम्याजिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक : आज प्रचाराचा शेवटचा दिवस ;निवडणूक निर्णय अधिकारी...

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक : आज प्रचाराचा शेवटचा दिवस ;निवडणूक निर्णय अधिकारी यांची माहिती

 

प्रतिनिधी | वलांडी

 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज, ५ फेब्रुवारी रोजी प्रचाराचा शेवटचा दिवस असून, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदानाच्या तब्बल ४८ तास अगोदर म्हणजेच आज रात्री १० वाजता प्रचार कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यानंतर निवडणूक आचारसंहितेनुसार कोणत्याही प्रकारच्या प्रचारास पूर्ण बंदी लागू होणार आहे.

 

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने प्रचाराबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार मतदान होण्याच्या ४८ तास आधी जाहीर सभा, रॅली, कॉर्नर बैठका, प्रचार वाहने तसेच घराघरांत प्रत्यक्ष संपर्क साधण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या, ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याने आज, ५ फेब्रुवारी रात्री १० वाजेपर्यंतच उमेदवारांना प्रचार करता येणार आहे.

 

या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ३ गटांसाठी ११ उमेदवार, तर पंचायत समितीच्या ६ गणासाठी १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्ष व उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

आज रात्री १० वाजल्यानंतर रस्त्यांवरील सभा, प्रचार रॅली, वाहनांवरील प्रचार, ध्वनिक्षेपकांचा वापर, पत्रके वाटप तसेच घराघरांत संपर्क यावर पूर्णतः बंदी लागू होणार आहे. यासोबतच प्रचारासाठी लावलेले बॅनर, झेंडे, फलक व इतर साहित्यही निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार हटवावे लागणार आहे.

 

दरम्यान, प्रत्यक्ष प्रचारावर बंदी असली तरी डिजिटल प्रचारावर नियंत्रण ठेवणे निवडणूक प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, यूट्यूब यांसारख्या सोशल मीडिया माध्यमांतून पोस्ट, व्हिडिओ, रील्सच्या माध्यमातून प्रचार सुरू असल्याचे चित्र आहे. आयोगाने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या असल्या, तरी ऑनलाइन प्रचाराचा वेग रोखणे कठीण ठरत आहे.

 

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी अनेक पक्ष व उमेदवार सोशल मीडियाचा प्रभावी माध्यम म्हणून वापर करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रचार आज रात्री थांबणार असला, तरी डिजिटल पातळीवर हालचाली सुरू राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे एकूण वातावरण सध्या दिसून येत आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आयटी फ्रेशर्सना उशीर झालेल्या ऑफर, अचानक बंदचा फटका. पुणे बातम्या

0
या वर्षी भाड्याने घेण्यास एक डुबकी लागते पुणे : पुण्यातील नवीन अभियांत्रिकी पदवीधर, विशेषत: संगणक शास्त्रातून, अलीकडील वर्षांतील सर्वात कठीण रोजगाराच्या वातावरणात नेव्हिगेट...

अजित पवारांना दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण हवे होते नाकारून काहींनी ‘पाप’ केले: सुप्रिया | पुणे...

0
पुणे : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही गटांमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू असल्याची कबुली देत ​​राष्ट्रवादीच्या (सप) कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी त्यांची...

पुणे राज्याची गुन्हेगारी राजधानी नाही, कायदा आणि सुव्यवस्था सुधारली आहे: सीपी ते सुप्रिया. पुणे...

0
पुणे : पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी दुपारी शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेत यंदा सुधारणा झाल्याचे स्पष्ट केले आणि बारामतीच्या खासदार...

सूर्यकिरणची ३० वर्षे: भारताचे लाल बाण नेमकेपणा, अभिमान आणि राष्ट्रीय आकांक्षेचे प्रतीक कसे बनले....

0
संघाला 30 वर्षे पूर्ण होत असताना, कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन अजय दाशरथी म्हणतात की सूर्यकिरणचा प्रवास हा IAF च्या प्रवासापासून अविभाज्य आहे. पुणे:...

म्यानमार घोटाळ्याच्या कंपाऊंडमध्ये पुण्याचा माणूस ‘सायबर गुलाम’ म्हणून कसा संपला | पुणे बातम्या

0
दोन भारतीयांसह कार लवकरच एका मोठ्या नदीच्या काठावर थांबली, जिथे ड्रायव्हरने एक बंदूक आणि एक मोठा चाकू बाहेर काढला. तसेच दोघांना डोळ्यावर पट्टी...

आयटी फ्रेशर्सना उशीर झालेल्या ऑफर, अचानक बंदचा फटका. पुणे बातम्या

0
या वर्षी भाड्याने घेण्यास एक डुबकी लागते पुणे : पुण्यातील नवीन अभियांत्रिकी पदवीधर, विशेषत: संगणक शास्त्रातून, अलीकडील वर्षांतील सर्वात कठीण रोजगाराच्या वातावरणात नेव्हिगेट...

अजित पवारांना दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण हवे होते नाकारून काहींनी ‘पाप’ केले: सुप्रिया | पुणे...

0
पुणे : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही गटांमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू असल्याची कबुली देत ​​राष्ट्रवादीच्या (सप) कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी त्यांची...

पुणे राज्याची गुन्हेगारी राजधानी नाही, कायदा आणि सुव्यवस्था सुधारली आहे: सीपी ते सुप्रिया. पुणे...

0
पुणे : पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी दुपारी शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेत यंदा सुधारणा झाल्याचे स्पष्ट केले आणि बारामतीच्या खासदार...

सूर्यकिरणची ३० वर्षे: भारताचे लाल बाण नेमकेपणा, अभिमान आणि राष्ट्रीय आकांक्षेचे प्रतीक कसे बनले....

0
संघाला 30 वर्षे पूर्ण होत असताना, कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन अजय दाशरथी म्हणतात की सूर्यकिरणचा प्रवास हा IAF च्या प्रवासापासून अविभाज्य आहे. पुणे:...

म्यानमार घोटाळ्याच्या कंपाऊंडमध्ये पुण्याचा माणूस ‘सायबर गुलाम’ म्हणून कसा संपला | पुणे बातम्या

0
दोन भारतीयांसह कार लवकरच एका मोठ्या नदीच्या काठावर थांबली, जिथे ड्रायव्हरने एक बंदूक आणि एक मोठा चाकू बाहेर काढला. तसेच दोघांना डोळ्यावर पट्टी...
error: Content is protected !!