Homeताज्या बातम्याजिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक : आज प्रचाराचा शेवटचा दिवस ;निवडणूक निर्णय अधिकारी...

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक : आज प्रचाराचा शेवटचा दिवस ;निवडणूक निर्णय अधिकारी यांची माहिती

 

प्रतिनिधी | वलांडी

 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज, ५ फेब्रुवारी रोजी प्रचाराचा शेवटचा दिवस असून, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदानाच्या तब्बल ४८ तास अगोदर म्हणजेच आज रात्री १० वाजता प्रचार कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यानंतर निवडणूक आचारसंहितेनुसार कोणत्याही प्रकारच्या प्रचारास पूर्ण बंदी लागू होणार आहे.

 

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने प्रचाराबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार मतदान होण्याच्या ४८ तास आधी जाहीर सभा, रॅली, कॉर्नर बैठका, प्रचार वाहने तसेच घराघरांत प्रत्यक्ष संपर्क साधण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या, ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याने आज, ५ फेब्रुवारी रात्री १० वाजेपर्यंतच उमेदवारांना प्रचार करता येणार आहे.

 

या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ३ गटांसाठी ११ उमेदवार, तर पंचायत समितीच्या ६ गणासाठी १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्ष व उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

आज रात्री १० वाजल्यानंतर रस्त्यांवरील सभा, प्रचार रॅली, वाहनांवरील प्रचार, ध्वनिक्षेपकांचा वापर, पत्रके वाटप तसेच घराघरांत संपर्क यावर पूर्णतः बंदी लागू होणार आहे. यासोबतच प्रचारासाठी लावलेले बॅनर, झेंडे, फलक व इतर साहित्यही निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार हटवावे लागणार आहे.

 

दरम्यान, प्रत्यक्ष प्रचारावर बंदी असली तरी डिजिटल प्रचारावर नियंत्रण ठेवणे निवडणूक प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, यूट्यूब यांसारख्या सोशल मीडिया माध्यमांतून पोस्ट, व्हिडिओ, रील्सच्या माध्यमातून प्रचार सुरू असल्याचे चित्र आहे. आयोगाने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या असल्या, तरी ऑनलाइन प्रचाराचा वेग रोखणे कठीण ठरत आहे.

 

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी अनेक पक्ष व उमेदवार सोशल मीडियाचा प्रभावी माध्यम म्हणून वापर करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रचार आज रात्री थांबणार असला, तरी डिजिटल पातळीवर हालचाली सुरू राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे एकूण वातावरण सध्या दिसून येत आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॉसमॉस बँकेच्या माजी अध्यक्षांचे निधन | पुणे बातम्या

0
पुणे : कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांचे गुरुवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांना 1978 मध्ये बँकेच्या...

भोरमध्ये अन्न प्रक्रिया केंद्र, व्यवहार्यता तपासण्यासाठी सरकारची मुख्यमंत्र्यांची नजर. पुणे बातम्या

0
पुणे : भोर तालुक्याला अन्न प्रक्रिया विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) किंवा निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याच्या व्यवहार्यतेची सरकार तपासणी करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

पहिली CBSE इयत्ता पुण्यातील विद्यार्थ्यांनी चांगला निकाल लावला | पुणे बातम्या

0
पुणे/मुंबई: सीबीएसई इयत्तामुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा 95% उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.7% विरुद्ध नोंदवले. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण होण्याचा दर 87.5% आहे.पुण्यातील शाळांनी उच्च...

नाशिक टीसीएस प्रकरण: इन्फोसिसने पुणे छेडछाडीच्या आरोपांवर निवेदन जारी केले; नाशिक टीसीएस प्रकरणानंतर छाननीत...

0
पुणे: आयटी क्षेत्रातील प्रमुख इन्फोसिसने बुधवारी त्यांच्या पुण्यातील बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट (बीपीएम) सुविधेवर कामाच्या ठिकाणी छळवणूक केल्याच्या सोशल मीडियाच्या आरोपांना औपचारिक प्रतिसाद...

रहिवाशांच्या तक्रारींनंतर पीएमसीने तीन महिन्यांत पुण्यातील 30 आरएमसी प्लांटवर कारवाई केली. पुणे बातम्या

0
पुणे: नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर नागरी संस्थेने शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्लांट्स विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गेल्या तीन महिन्यांत, पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...

कॉसमॉस बँकेच्या माजी अध्यक्षांचे निधन | पुणे बातम्या

0
पुणे : कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांचे गुरुवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांना 1978 मध्ये बँकेच्या...

भोरमध्ये अन्न प्रक्रिया केंद्र, व्यवहार्यता तपासण्यासाठी सरकारची मुख्यमंत्र्यांची नजर. पुणे बातम्या

0
पुणे : भोर तालुक्याला अन्न प्रक्रिया विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) किंवा निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याच्या व्यवहार्यतेची सरकार तपासणी करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

पहिली CBSE इयत्ता पुण्यातील विद्यार्थ्यांनी चांगला निकाल लावला | पुणे बातम्या

0
पुणे/मुंबई: सीबीएसई इयत्तामुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा 95% उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.7% विरुद्ध नोंदवले. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण होण्याचा दर 87.5% आहे.पुण्यातील शाळांनी उच्च...

नाशिक टीसीएस प्रकरण: इन्फोसिसने पुणे छेडछाडीच्या आरोपांवर निवेदन जारी केले; नाशिक टीसीएस प्रकरणानंतर छाननीत...

0
पुणे: आयटी क्षेत्रातील प्रमुख इन्फोसिसने बुधवारी त्यांच्या पुण्यातील बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट (बीपीएम) सुविधेवर कामाच्या ठिकाणी छळवणूक केल्याच्या सोशल मीडियाच्या आरोपांना औपचारिक प्रतिसाद...

रहिवाशांच्या तक्रारींनंतर पीएमसीने तीन महिन्यांत पुण्यातील 30 आरएमसी प्लांटवर कारवाई केली. पुणे बातम्या

0
पुणे: नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर नागरी संस्थेने शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्लांट्स विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गेल्या तीन महिन्यांत, पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...
error: Content is protected !!