मानवी हक्क अभियान संघटनेचे उदगिर शहराध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी केले एफ आर कलमात वाढीचा पाठपुरावा
देवणी/लक्ष्मण रणदिवे
उदगीर हादरलं, एका आरोपींस अटक उदगीर तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली असून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिला मित्रांच्या मदतीने हैदराबाद येथे नेवून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण लव्ह जिहाद चा प्रकार असून फास्टट्रॅक कोर्टात चालवावे व अल्पवयीन मुलींस पळवून नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांस फाशी ची शिक्षा दयावी मदत करणाऱ्या त्याच्या मित्रास सह आरोपी करावे व सर्व आरोपीनवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मुलीच्या आई वडिलांची मागणी आहे.सविस्तर घटना अशी की दि.१४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री मुलीला मित्राच्या मदतीने उदगीर तालुक्यातील तादलापूर गावातून गाडीवर बसवून व उदगीर रेल्वे स्टेशनं वरून हैद्राबाद येथे घेऊन गेले. तेव्हा
आपली मुलगी बाथरूम ला जाऊन परत कशी आली नाही म्हणून मुलीच्या वडिलांनी गावात नांतलगा कडे शोध घेतला असता मुलगी कुठेही आढळून आली नसल्याने त्याने ग्रामीण पोलीस स्टेशनं उदगीर येथे तक्रार दिले त्या वरून दिनांक १५/०२/२६ रोजी अज्ञाताविरुध्द गुन्हा क्रमांक ६७/२०२६ क्रमांकाप्रमाणे ग्रामीण पोलीस ठाणे उदगीर येथे भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय पद्धतीने पोलिसांनी तपास चक्र फिरवले असता हैद्राबाद येथून आरोपी व मुलगी मिळुन आली असता तातडीने पोलिसांनी आरोपीस कोर्टा पुढे हजर करून पोलीस कस्टडीत घेतले असता आरोपीने यांने अल्पवयीन मुलींस पळवुन नेऊन तिच्यावर बलात्कार केला हे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले यावरुन भारतीय न्याय संहितेच्या ६४(१),६५(१),३५१(२) व बाल लैंगिक अपराध प्रतिबंध कायद्याचे कलम ४,८,१२या कलमान्वये या गुन्ह्यात वाढ करण्यात आली आहे,
मात्र अद्यापही आत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमा समाविष्ट करण्यात आल्या नाहीत, तरी करिता या कायद्याच्या कलमा समाविष्ट करण्यात येऊन पिडीतांना कडक संरक्षण देण्यात यावे,व तत्काळ आर्थिक सहाय्य देण्यात यावे,आरोपीस कठोर शिक्षा देण्यात यावी,व या गुन्ह्यात सहाय्य करणाऱ्यां इतर ही आरोपीचा शोध घेऊन त्यांना देखील या गुन्ह्यात समाविष्ट करण्यात यावे.अशी मुलीच्या आई वडिलांची मागणी आहे. तसेंच अल्पवयीन मुलींस व तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा व घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ दिनांक २६/०२/२६ रोजी मानवी हक्क अभियान संघटना शहर कार्यकारणी उदगीरद्वारे मानवी हक्क अभियान प्रसिद्धी प्रमुख अर्जुन जाधव, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे, लातूर जिल्हा सचिव मारुती भाऊ गुंडीले, उदगीर तालुकाध्यक्ष काशिनाथ कांबळे, उदगीर शहराध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांच्या पाठपुरावामुळे कलमात केली वाढ, अनेक सामाजिक संघटना संघटने मार्फत उप-जिल्हा अधिकारी उदगीर यांना निवेदन देऊन कळवले आहे

























