वलांडी | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्याची बातमी आज सकाळी सुमारे ८.४५ वाजता तालुक्यात पसरताच वलांडी येथे शोकमय वातावरण निर्माण झाले.
या बातमीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कार्यकर्ते खळबडून एकत्र आले. वलांडी येथील बाजारपेठ सुमारे एक तास बंद ठेवण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत दोन मिनिटांचा मौन पाळून भावनिक वातावरणात सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.
या वेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
























